बेबंदशाही
बेबंदशाही ...
मनुस्मृती नुसार कुठल्या गुन्ह्याला कुठली शिक्षा आहे,त्याची कल्पना नाही. एकीकडे देशातील संविधान बदलून मनुस्मृती लादली जाईल, अशीही ओरड आहे. देशात मनुस्मृती येईल ना येईल, हे ठाऊक नाही, परंतु अराजकता येईल (किंबहुना ती आलीच आहे) हे नक्की!
याचे कारण असे, राज्यातील निवडून आलेले व आता मंत्री झालेले काही नमुने ,राज्यात कुठे बलात्कार झाला, की संविधानानुसार तपास,चौकशी, न्यायालयीन सोपस्कार वगैरे बाबी बासनात गुंडाळून, टीव्ही कॅमेऱ्यासमोर,' गुन्हेगाराला फाशी दिली पाहिजे, गुन्हेगाराला दगडाने ठेचून मारले पाहिजे ', अशी बेताल वक्तव्ये करतात.
या महाशयांना हे समजले पाहिजे, की आज आपण ज्या पदावर कार्यरत आहोत, ते संविधानानुसार की आणखी कसे? कुठल्याही मंत्र्याचा पायपोस कुणाला नाही. एखादा उठतो, तो बेधडकपणे 'भाजपेतर सरपंचांना निधी देणार नाही', असे छातीठोकपणे चॅनल्स समोर गरळ ओकत आहे. कुणी उठून मशीदींवरील भोंग्याविषयी भोकांड पसरत आहे. बंदीच घालायची असेल तर सगळ्या धर्मातील जाहीर कार्यक्रमात लाऊडस्पिकरला बंदी असायला हवी.
अशा कितीतरी गोष्टी, घटना,बाबी आहेत यावरुन हे लक्षात यावे, की बेबंदशाही सुरु झालेली आहे.
--- राजू कसबे
Comments
Post a Comment