Posts

बेबंदशाही

बेबंदशाही ...              मनुस्मृती नुसार कुठल्या गुन्ह्याला कुठली शिक्षा आहे,त्याची कल्पना नाही. एकीकडे देशातील संविधान बदलून मनुस्मृती लादली जाईल, अशीही ओरड आहे. देशात मनुस्मृती येईल ना येईल, हे ठाऊक नाही, परंतु अराजकता येईल (किंबहुना ती आलीच आहे) हे नक्की!                 याचे कारण असे, राज्यातील निवडून आलेले व आता मंत्री झालेले काही नमुने ,राज्यात कुठे बलात्कार झाला, की संविधानानुसार तपास,चौकशी, न्यायालयीन सोपस्कार वगैरे बाबी बासनात गुंडाळून, टीव्ही कॅमेऱ्यासमोर,' गुन्हेगाराला फाशी दिली पाहिजे, गुन्हेगाराला दगडाने ठेचून मारले पाहिजे ', अशी बेताल वक्तव्ये करतात.               या महाशयांना हे समजले पाहिजे, की आज आपण ज्या पदावर कार्यरत आहोत, ते संविधानानुसार की आणखी कसे? कुठल्याही मंत्र्याचा पायपोस कुणाला नाही. एखादा उठतो, तो बेधडकपणे 'भाजपेतर सरपंचांना निधी देणार नाही', असे छातीठोकपणे चॅनल्स समोर गरळ ओकत आहे. कुणी उठून मशीदींवरील भोंग्याविषयी भोकांड पसरत आहे. बंदीच घालाय...

रामराज्य

चार -पाच वर्षांच्या मुलींवर, तरुणींवर , विवाहित -अविवाहित महिलांवर,६०-९० वर्षांच्या ज्येष्ठांवरही दररोज कुठे ना कुठे बलात्कार झाल्याच्या बातम्या पेपरमध्ये येत आहेत. तिथे काय तपास वगैरे करुन वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. पण सरकारी फौज केवळ स्वारगेट -पुणे येथील घटनास्थळी चॅनल्सचा फौजफाटा सोबत घेऊन ठिय्या मांडून बसली आहे . बस स्थानकच नव्हे तर राज्यातील कुठलाही कानाकोपरा सुरक्षित नसल्याची सर्वसामान्यांची धारणा आहे . बीडमधील गुन्हेगारी आटोक्यात येत नाही. परभणी खटल्यात काय सुधारणा आहे. ठिकठिकाणी कोयता गॅंग्स निर्माण होत आहेत. रात्री भरचौकात केक कापून वाढदिवस साजरे केले जात आहेत. अच्छे दिन आणि रामराज्य म्हणतात ते हेच का???                                                           --- राजू कसबे 

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी

टीव्ही वरील महायुतीच्या जाहिरातीचा महाविकास आघाडीने योग्य प्रकारे प्रतिवाद केला नाही. दोन स्त्रिया बोलत असताना एक स्त्री म्हणते,की सरकार बदललं तर अर्ध्या किमतीत एसटीचा प्रवास कसा होईल? वस्तुतः आघाडीने कर्नाटक सरकारप्रमाणेच महिलांना एसटीचा प्रवास मोफत, तसेच लाडक्या बहिणींना रुपये ०३ हजार दरमहा आणि सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा रुपये ०४ हजार देणार होते. परंतु जनतेसमोर हे मुद्दे ठळकपणे मांडले गेले नाहीत. ठिकठिकाणी स्त्रियांचे मेळावे आयोजित केले नाहीत. ही निवडणूक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनीच भाकरी फिरवल्यामुळे एकतर्फी झाल्याची कबुली युतीच्या नेत्यांनी दिली, यांतच सर्व काही आले. आता यापुढे सीएनजी रिक्षाचे भाडे वाढो वा घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ होवो, ह्या लाडक्या बहिणीं दरमहा मिळणाऱ्या रुपये २१००/- च्या गाजरावर पुढील पाच वर्षे निमूटपणे मूग गिळून दिवस ढकलतील... तूर्तास इतुकेच... जय हो  --- राजू कसबे

महाराष्ट्र विधानसभेचे गौडबंगाल

लोकसभा मतदानावेळी बराच गोंधळ झाला होता. उल्हासनगर येथे राहणाऱ्या मतदारांचे मतदान केंद्र कुणाचे अंबरनाथ येथे तर कुणाचे अगदी डोंबिवली येथेही आले होते. आता ह्याला संबंधित यंत्रणेची चूक म्हणावी,की मतदार ह्या झंझटमारीला वैतागून मतदान न करता सरळ घरी जाऊन बसावा आणि मतांची टक्केवारी कमी व्हावी, अशी कुठल्या राजकीय पक्षाची इच्छा असावी, काही कळायला मार्ग नाही... प्रत्यक्षात हाती काही पुरावा नसला तरी उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रचार फेरीत तसेच प्रचार सभेत सहभागी होणाऱ्या आम जनतेचे घसे तद्वत खिसे देखील ओले केले जाताहेत म्हणे! समाजातील गरीब घटक तसेच बायाबापड्या ह्या खेळीला बळी पडत आहेत. ही विधानसभा निवडणूक आघाडी आणि युतीसाठी केवळ प्रतिष्ठेची न राहता आता अटीतटीची देखील झाली आहे, असे म्हणावयास काहीच प्रत्यवाय नसावा. जनतेच्या माथी निव्वळ वेगवेगळी आमिषे मारण्यात कुणीही मागे नाही. लाडक्या बहिणींना, बेरोजगार तरुणांना, वृध्दांना समाजातील जवळजवळ सगळ्याच घटकांना वेगवेगळ्या आर्थिक प्रलोभनरुपी गळाला लावण्याची जणू अहमहमिका लागली आहे. आता कुणीतरी निवडून येणार हे तर खरेच, परंतु सत्तेवर आल्यानंतर एवढ्या म...

" केमिकल लोच्या "

कलकत्ता येथील प्रकरण असो वा बदलापूर येथील ताजे प्रकरण... ही प्रकरणे घडून देखील अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या बातम्यांचा खच दिवसेंदिवस वाढतोच आहे. कधीतरी वाचनात आले होते, की दारु पिण्याची तीव्र इच्छा ही मेंदूत होणाऱ्या रासायनिक उलाढालीतून होते म्हणे! असेलही कदाचित ... तसेच शरीरसुखाचा आनंद घेण्याची इच्छा वा इतर कुठल्याही गोष्टीचा आस्वाद घेण्याची इच्छा ही मेंदूतच तर निर्माण होते.                     पौगंडावस्थेत मुलामुलींची अवस्था तर अतिशय अवघड असते, कारण शारीरिक व मानसिक पातळीवर केमिकल लोच्या जबरदस्त प्रमाणात उलथापालथ करत असतो. ह्या कालावधीत आईवडील आणि इतर नातेवाईक यांच्यापेक्षा मित्रमैत्रिणी खूप जवळच्या वाटत असतात. अशावेळी पाल्यांपेक्षा बिकट अवस्था पालकांची होते. पालकांना मुलांची ही घुसमट समजत असते, परंतु ती कशी हाताळायची याविषयी मात्र ते स्वतःच संभ्रमात असतात. सध्याच्या स्पर्धात्मक व संगणक युगात दररोज निघणाऱ्या नवनवीन गॅजेट्सचा कसा नि कुठवर वापर करावा,ह्यालाही काही ताळतंत्र राहिला नाही. हातातील मोबाईल काढून घेतला म्हणून आत...

सरकार हवे कशाला?

लोकांनी, सामाजिक संस्थांनी सरकारकडे तोंड न वेंगाडता वेगवेगळे उपक्रम उभारण्यासाठी समाजातील धनदांडग्या पुढे पदर पसरावा, असे प्रतिपादन शासनातील काही मंत्री करत आहेत. मग यांना निवडून द्यायचे तरी कशाकरिता ? - राजा सोलापूरकर 

पवित्र मृत्यू

शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, कारण सर्वसाधारणपणे मृत्यू हा भयावह, त्रासदायक व इहलोकीची यात्रा संपविणारा असतो. परंतु जगात असेही काही लोक आहेत, जे धार्मिक उत्सव, यात्रा, अनुष्ठान वगैरे समयी झालेल्या मृत्यूला पवित्र समजून घेतात , भलेही या घटना मानवी चुकांमुळे का घडलेल्या असेना !. जसे नुकत्याच होऊन दहीहंडी उत्सवाला दरवर्षी अपघाताचे गालबोट लागते. अनेक गोविंदा आयुष्यभरासाठी दिव्यांग होतात, कित्येकांचा मृत्यू होतो.पण कुणाला त्याचे इतके वाईट वाटत नाही. लोकांच्या श्रद्धेनुसार हे मृत्यू पवित्र धार्मिक कार्य करताना झालेले आहेत.                           असे दरवेळी अनेक बाबतीत घडते, मग तो गोपालकाला असो, अमरधाम यात्रा असो,पंढरपूरची वारी असो वा कालचा गणेशोत्सव असो. नैसर्गिक आपत्ती वा मानवी चुकांमुळे, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाले तरी त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी अशी "पवित्र मृत्यू"ची मखलाशी उपयोगी पडते खरी!                       ...